आजच्या दिवसाला धर्मनाथ बीज म्हणून संबोधले जाते, माघ महिन्यातील द्वितीया, जिला धर्मबीज असें म्हणतात. या तिथीला नाथपंथात विशेष महत्व आहे. या दिवशीं श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली. व त्या वेळेस सर्व देवी देवतांना आमंञित केले होते. तसेच प्रयाग क्षेञातील सर्व नगरवासी लोकांचाहि मोठा मेळा जमला होता. यादिवशी भव्य अन्नदान (भंडारा)झाला व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता. यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला. व देवांसह सर्वांनी दरसाल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी ईच्छा प्रगट केली. श्री गोरक्षनाथांनी "धर्मनाथबीजेचा" उत्सव प्रतिवर्षीं करण्याची त्रिविक्रमास आज्ञा दिली. तेव्हां सर्वास आनंद झाला व दरसाल या दिवशीं उत्सव होऊं लागला. गोरक्षनाथानें आपल्या 'किमयागिरी' नामक ग्रंथांत असें लिहिलें आहे कीं. आपापल्या शक्त्यनुसार जो कोणी हें बीजेचें व्रत करील त्याच्या घरीं दोष, दारिद्र्य, रोग आदिकरुन विघ्नें स्वप्नांत देखील यावयाची नाहींत. त्या पुरुषांचा संसार सुनियंत्रित चालेल. प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या गृहीं वास्तव्य करील. याप्रमाणें हा धर्मनाथ बीजेचा महिमा होय.
आज विद्यानगर,विश्रामबाग,सांगली मध्ये नाथपंथी डवरी समाजाच्या वतीने धर्मनाथ बीज आणि पारायण सोहळा मोठ्याने संपन्न झाला, श्री योगी ओमकारणाथ महाराज कुंडल यांच्या उपस्थित नवनाथांची पूजा करून नऊ मुलांना जेवण खावू घालून आजची पूजा व आरती करून कार्यक्रम पार पडला,दर वर्षी येथे हा कार्यक्रम घेण्यात येतो,
या प्रसंगी मछिंद्रनाथ बामणे,अंबरनाथ बामणे,रोहित जाधव,संतोष बामणे,सागर बामणे,जितेंद्र कोष्टी,अंकुश डवरी नाथ महाराज, शंतिनाथ जाधव,आदिनाथ जाधव,उमेश कदम,सुभाष जाधव, सौ.शारदा जाधव,सौ दिपाली बामणे,मंगल बामणे,शांता बामणे,स्वाती हिंगमिरे यासह अनेक नाथ बांधव आणि नागरिक उपस्थित होते.



No comments:
Post a Comment